Tuesday, January 4, 2011

कधी कधी !

कधी कधी मला असा एकांत हवा असतो की मीच मला नको असतो …फोन स्विच ऑफ करावा तस मेंदुलाही बंद ठेवावस वाटत…… कसाचा……कसाचाही विचार नको असतो…ना आंनदी क्षणाचा की बोच-या विचारांचा……
मग मनात धुमसारी आग क्षणात विझुन जावी आणि विस्तव शिल्लक नसेल तेव्हा जाग यावी……पण अस होत नाही आणि करताही येत नाही…झोप नावाची गोष्टही मनाला रंजवत नाही…स्वप्नातही सगळ सारखच्…का नाही स्वस्थ राहता येत मनाला कुणास ठाऊक?

No comments:

Post a Comment